शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

वाढत्या तापमानामुळे पानवेली कोमेजू लागल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:13 IST

दिलीप कुंभार ।लोकमत न्यूज नेटवर्कनरवाड : लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान उत्पादकांच्या पानवेली वाढत्या उन्हाच्या झळांमुळे होरपळू लागल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचल्याने पानवेलींचे शेंडे व पाने काळी पडून करपू लागली आहेत. दरम्यान, पान उत्पादनात घट आल्याने पान उत्पादक, वाहतूकदार, हमाल आणि विक्रेते ...

दिलीप कुंभार ।लोकमत न्यूज नेटवर्कनरवाड : लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान उत्पादकांच्या पानवेली वाढत्या उन्हाच्या झळांमुळे होरपळू लागल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचल्याने पानवेलींचे शेंडे व पाने काळी पडून करपू लागली आहेत. दरम्यान, पान उत्पादनात घट आल्याने पान उत्पादक, वाहतूकदार, हमाल आणि विक्रेते यांच्या जनजीवनावर विपरित परिणाम झाला आहे.पानवेल ही नाजूक वनस्पती असून, पानवेलीच्या जोमदार वाढीसाठी सततचे ढगाळ हवामान, रिमझिम पाऊस आणि निचऱ्याची जमीन असावी लागते. पानवेली किमान २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमानाला तग धरतात. मात्र वाढणाºया तापमानाचा घातक परिणाम पानवेलींवर दिसू लागतो. अशीच परिस्थिती महाराष्ट्रातील काही भागातून पाहावयास मिळते. यामध्ये सांगली जिल्ह्याचाही समावेश आहे.सांगली जिल्ह्यात २२४ हेक्टर क्षेत्रावर खाऊच्या पानमळ्यांची लागण केली आहे. यापैकी मिरज तालुक्यातील १९८ हेक्टर क्षेत्रात पानवेलींची लागवड केली आहे. केवळ नरवाडला १०० हेक्टर क्षेत्रावर पानमळ्याची लागण झाली आहे. म्हणून या क्षेत्राला पानमळ्यांचे आगार समजले जाते. येथूनच संपूर्ण राज्यात पाने विक्रीसाठी पाठविली जातात. मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी, राजकोट (गुजरात), लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर आदी प्रमुख पान बाजारपेठांना खाऊची पाने एजंटाकडून मागवून वाहतूक केली जाते. तसेच यावर अवलंबून असलेल्या शेतमजुरांच्या हातालाही काम मिळत नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.उन्हाचा पारा आणखी वाढल्यास पानवेलींच्या बुंध्याशी असलेले पानवेलीचे वेटोळे करपून पानवेली वाळून जाण्याची भीती पान उत्पादकांतून व्यक्त होत आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होऊन आर्थिक फटका बसणार आहे.उत्पादकांसाठी उपाययोजनामिरज तालुक्याचे कृषी अधिकारी एच. एस. मेडीदार यांनी पानवेलींचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी काही उपाययोजना सुचविल्या आहेत.पानमळ्याला उन्हाळ्याच्या कालावधित तुषार सिंचनाचा वापर करावा.पाणी उपलब्ध असल्यास वाफ्याने पाणी द्यावे.पानमळ्याची तटबंदी सेडनेटऐवजी उसाच्या पाल्याने करावी.रसायनांचा वापर पूर्णपणे टाळून सेंद्रीय खतांचा वापर करावा.उन्हाळ्याच्या कालावधित पानमळ्यातील सावली कमी करू नये.